प्लास्टिक प्रदूषण रोखणे आणि प्रामुख्याने विकसनशील देशांच्या शाश्वत विकासाला बाधा न पोहचवता यात महत्त्वपूर्ण समन्वय साधण्याचे भारताचे बुसानमधील आयएनसी-5 समारोप सत्रामध्ये आवाहन

दक्षिण कोरियातील बुसान येथे आयोजित आंतरशासकीय वाटाघाटी समितीच्या (आयएनसी-5) पाचव्या अधिवेशनाच्या समारोप सत्रामध्ये भारताने आपली भूमिका मांडताना प्लास्टिक प्रदूषणाचे आव्हान आणि त्याची व्यापक तीव्रता याची जाणीव करुन दिली. या समस्येवर कोणत्याही एका राष्ट्राला स्वतंत्रपणे संपूर्ण तोडगा काढता येणार नसल्याचेही भारताने यावेळी नमुद केले. या संदर्भात अध्यक्ष आणि…
